Skip to main content

Posts

Showing posts from May, 2018

५ असे कोर्स जे २०२१ मध्ये B.Com विद्यार्थ्यांचे जीवन बदलू शकतात ( 5 courses that could change B.Com students' lives in 2021)

जशी भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत चालली आहे तसे वाणिज्य शाखेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना करिअर च्या अनेक वाटा उपलब्ध होत चालल्या आहेत. आज या लेखात आपण B.Com नंतर करता येतील अशा काही चांगल्या कोर्सेस बद्दल चर्चा करणार आहोत. १) CA ( Chartered Accountant ) आपणास माहित आहेच कि सी. ए. हि वाणिज्य शाखेतील सर्वोच्च पदवी समजली जाते. या कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना Accountancy, Taxation, Auditing बद्दल सखोल माहिती दिली जाते.  भारतामध्ये सी. ए. केलेल्या लोकांची ची संख्या गरजेपेक्षा कमी असल्यामुळे हा एक उत्तम करिअर चा मार्ग असू शकतो. २) CWA ( Cost and Works Accountant ) C.A. प्रमाणेच याही कोर्स मध्ये विद्यार्थांना Cost Accounting, Taxation इत्यादी बद्दल सखोल माहिती दिली जाते. C.A. प्रमाणेच भारतामध्ये CWA केलेल्या लोकांची ची ही संख्या गरजेपेक्षा कमी असल्यामुळे हाही एक उत्तम करिअर चा मार्ग होऊ शकतो. ३) CS ( Company Secretary ) कंपनी सेक्रेटरी हा एक कंपनी व त्याचे शेअर होल्डर यामधील एक महत्वाचा दुवा असतो. तसेच कंपनी कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी या दृष्ठीने एक कंपनी स...

कॉमर्स स्टुडंटनी सुट्टीत काय करावे ( What to do in holidays )

आजकाल आपण सर्व्याच्या तोंडी ऐकतो कि बेरोजगारी खूप वाढली आहे आणि चांगली नोकरी मिळवणे खूप अवघड आहे. पण याठिकाणी एक गोष्ठ विसरली जाते कि कोणतीही नोकरी मिळवण्यासाठी त्यासाठी काही आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असते. आणि अशी कौशल्ये आपल्याकडे असतील तर चांगली नोकरी मिळवणे फारसे अवघड नाही. वाणिज्य शाखेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही अशी काही कौशल्ये शिकून घेणे आवश्यक आहे. आता सर्वांच्याच परीक्षा संपल्या असतील त्यामुळे मोकळ्या वेळात खालील काही कौशल्ये जर आपण आत्मसात करुन घेतली तर सहजपणे चांगली नोकरी मिळवणे शक्य आहे होईल. १) बेसिक अकौंटिंग : सर्व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थांना बेसिक अकौंटिंग येणे खूप आवश्यक आहे. बेसिक अकौंटिंग मध्ये आपण जर्नल एन्ट्री , लेजर पोस्टिंग , ताळेबंद तयार करणे , बँक रिकन्सीलेक्शन स्टेटमेंट तयार करणे इत्यादी येणे आवश्यक आहे. जवळपास हे सर्वच आपण ११ वी व १२ वी मध्ये शिकलो आहोत. परंतु उजळणी न केल्यामुळे त्यातील बर्याच गोष्टी आपण विसरला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो पुन्हा एकदा या गोष्टींची उजळणी केलीत तर नक्कीच फायदा होईल. २) कॉम्पुटर चे ज्ञान...